परभणी, दि. 9 (जिमाका) :-राज्य शासनाने राज्यात मागील दोन वर्षात राबविलेल्या विविध विकासकामे आणि योजनांची माहिती लांब पल्याच्या पाच एक्सप्रेस रेल्वेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात मुंबई ते नागपूर धावणाऱ्या ‘नंदीग्राम एक्सप्रेस’ची निवड करण्यात आली असून, राज्य शासनाने मागील दोन वर्षात राबविलेली विकासकामे आणि योजनांची आकर्षक पद्धतीने माहितीसह प्रवास करत आहे. ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’, ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ अंतर्गत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यात कौशल्य विकास-रोजगार मेळावा आणि वेबपोर्टलद्वारे दीड लाख बेरोजगारांना रोजगार, महिला सक्षमीकरणातंर्गत कुटूंबातील महिलांच्या नावावर घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्याची सूट, कोरोना महामारीत पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखांची मुदत ठेव योजना, चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा आता दारी येणार, ई-पीक पाहणी नोंदणीही करता येणार, जिथे सारथी तिथे प्रगती-क्षमता आणि कौशल्य वृद्धीसाठी शिक्षण-प्रशिक्षण, पर्यावरणपूरक प्रवासाला राज्य शासनाचे प्राधान्य, विद्युत बस सेवेत वाढ राज्यातील प्रदूषणाला आळा आदी माहिती ‘नंदीग्राम एक्सप्रेस’द्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. राज्य शासनाची विकासकामे व योजनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचावीण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या एक्सप्रेस रेल्वेवर लावण्यात आलेल्या आकर्षक जाहिराती प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News